WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Vishwas Patil | विश्वास पाटील

Vishwas Patil | विश्वास पाटील

जन्मतारीख:२८ नोव्हेंबर १९६९
शिक्षण:
१. IAS Officer
२. M.A English Literature
३. Degree in Law
राजहंस प्रकाशित साहित्य:
१. पानिपत
२. झाडाझडती
३. महानायक
४. चंद्रमुखी
५. लस्ट फॉर लालबाग
६. अण्णा भाऊ साठेंची दर्दभरी दास्तान
७. पांगिरा
पुरस्कार:
पानिपत
१. नाथ माधव पारितोषिक, १९८९.
२. भारतीय भाषा परिषद पारितोषिक, १९९०
झाडाझडती
१. प्रियदर्शिनी राष्ट्रीय पारितोषिक, १९९०
२. विखेपाटील पारितोषिक, १९९०
३. साहित्य अकादमी पुरस्कार, १९९२
महानायक
१. गडकरी पुरस्कार, १९९८
* राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या `पानिपत’ आणि `झाडाझडती’ या दोन महत्त्वाच्या कालाकृतीनी त्यांना मराठी वाचकांमधे सर्वदूर पोचवले.
* १९९२चा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार त्यांना `झाडाझडती’ या कादंबरीसाठी मिळाला.
* अलीकडेच श्री. पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
* त्यासाठी विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या दोन कादंबर्‍यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
* श्री. पाटील यांच्या कादंबर्‍यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या `पानिपत’, `संभाजी’ आणि `महानायक या कादंबर्‍या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अ‍ॅमेझॉन कंपनीने तर `झाडाझडती’ (A Dirge for the Damned) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे.
* त्यांना प्रियदर्शनी नॅशनल अ‍ॅवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे सत्तरहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या तीन दशकांत प्राप्त झाले आहेत.
* पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यकांनी जाहीरपणे केला आहे.
* राज्य शासनाच्या सेवेत असताना आय. ए. एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षे रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले.
* ऐतिहासिक कादंबर्‍यांबरोबरच अनेक सामाजिक विषयांनाही त्यांनी हात घातला आहे.
* शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन व त्यातून येणारा अवर्षणाचा धोका(`पांगिरा’), मुंबईच्या * गिरणगावातील साठभर कापडगिरण्यांची विक्री व गिरणीवकामगारांचे हाल (`लस्ट फॉर लालबाग’),
* साखरधंद्यातील सुंदोपसुंदी (`नागकेशर’),
* लोक कलावंतांची हरपत जाणारी दुनिया व परवड (`गाभुळलेल्या चंद्रबनात’ व `चंद्रमुखी’),
* धरणग्रस्तांचे जगणे व मरणे (`झाडाझडती’) असे सामाजिक विषय व त्या पार्श्वभूमीवर पाटलांनी लिहिलेल्या त्यांच्या कादंबर्‍यांना मराठीसोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये मोठी लोकप्रियता लाभली आहे.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">