इतिहास
-
Sale! Add to cart'जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो - माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट! मात्र आज धर्म या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन... हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ. धर्म आणि हिंसा'
इतिहासBharatachi Kulkatha | भारताची कुळकथा
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. जायचं अडलं आहे का ? हितचिंतकांचा प्रश्न . पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ? तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या,दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी सरसावलेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज. भोवताली काचेचा खच ! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. जागोजागी वाळूच्या पोत्यांच्या भिंतीआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण ! भय इथले तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव
इतिहासBhay Ithale…Talibani Savat : Pratyaksha Anubhav | भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cart'२ डिसेंबर १९८४ भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट. विषारी वायू भोपाळभर पसरला. हजारो लोक मृत्यूमुखी पडले, शेकडो लोक अपंग झाले. या कोलाहलात शेतमजूर ते पाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले. हे सारे कसे घडले ? का घडले ? डेमिनीक लापिये आणि जाविएर मोरो या दोघांनी कसून शोध घेतला. सरकारी अहवाल काय म्हणतात ? वर्तमानपत्रे काय सांगतात ? पीडित माणसे काय बोलतात ? या सर्वांचा आधार घेऊन- उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे - ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !
इतिहासBhopalmadhil Kalratra | भोपाळमधील काळरात्र
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
All Books
Chanakya Chandragupta Ashok – Tridhara – Takshahila -Pataliputra Zanzavat | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – तक्षशिला-पाटलीपुत्र झंझावात
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartकंपनी सरकार म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. पानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी सत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. अशी होती शिवशाही आणि पुण्याचे पेशवे या महाराष्ट्राचा पूर्वरंग या मालेतील कंपनी सरकार म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला शाप की वरदान याचा अल्पसा विचार करून हा शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे.
इतिहासCompany Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). फाळणीचे मूलकारण कोणते होते ? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी ? फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती ? राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता ? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता ? अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय ? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते ? फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता! असे सरदार पटेल का म्हणाले होते ? आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले ? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.
इतिहासCongressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
₹900.00Original price was: ₹900.00.₹675.00Current price is: ₹675.00. Save ₹225 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more..या सुमाराला मला दारावर थाप ऐकू आली. दिवसाउजेडी दार वाजणं म्हणजे काही अशुभाची चाहूल नव्हे, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे कोण असावं, हे बघायला मी खाली आलो. पण या वेळी मात्र माझा होरा साफ चुकला. बाहेर सशस्त्र तरूण उभे होते. माझं काळीज लक्कन हललं. डायरीची पानं लपवायला मी आत धावलो आणि दारावरच्या धडकांचा आवाज माझ्या कानांवर आदळू लागला... २३ ऑगस्ट १९९०.
इतिहासDahshatichya Chayet : Dairy Eka Kashmiri Anamikachi | दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cart'अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्या बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं ? इतिहास - राजकारण - समाजकारण - धर्मकारण - अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे
इतिहासDhage Arab Jagache | धागे अरब जगाचे
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartरणरंगात न्हालेल्या धगधगत्या नंदनवनाची क्षात्रधर्मी कथा १९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा शापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित पाकिस्तानने जम्मू काश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे धाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांना मागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाच युध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणा संघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, विस्तारले आहे. दोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू- काश्मीरच्या भूमीवर चार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ शकलेली नाही. पाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक गडदगहिरा होत चालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा अत्यंत मूलगामी वेध घेणारा ग्रंथ म्हणजेच डोमेल ते कारगिल ! पाकिस्तानने फंदफितूरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, तेव्हापासून सुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाक घुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही) चालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहास घडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्या व्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी सैनिकांच्या बलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक वैशिष्टय आहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली दहा-बारा वर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या ग्रंथाचे तितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही नेमकेपणाने टिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द करील, यात शंकाच नाही. सूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथ युध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचा आहे.
इतिहासDomel Te Kargil | डोमेल ते कारगिल
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartप्रा. शेषराव मोरे हे १९८० नंतर महाराष्ट्रात उदय पावलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक होत. त्यांची मते कुणाला पटोत वा न पटोत, पण कुठल्याही प्रश्नावर लिहिताना त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे, परिश्रमपूर्वक संदर्भ गोळा करणे, त्या विचारांची संगती लावणे व त्यानंतर लेखनाला सुरवात करणे अशी एक शिस्त त्यांच्या लेखनाला आहे. त्यांची मते पटली नाहीत, तरी ती केवळ प्रतिक्रिया व्यक्त करून वा शेरेबाजी करून खोडून काढता येत नाहीत... "चिकित्सक लेखनाला जे मोकळे वातावरण हवे, ते हळूहळू संपत चालले आहे आणि चिकित्सेच्या नावाखाली काही राजकीय पक्षाची सोय होईल अशा भाडोत्री विचारवंतांचे लेखन सध्या प्रतिष्ठा पावू लागले आहे... फुले- आंबेडकरवाद बदनाम करावा किंवा विपर्यस्त स्वरूपात तो मांडावा ह्याचे पध्दतशीर प्रयत्न चालू आहेत. शौरी यांचे लेखन या स्वरूपाचे आहे... अशा अवस्थेत शौरीसारख्यांच्या हाती आणखी काही चुकीचे पुरावे आंबेडकर अनुयायांच्या उदासीन वृत्तीमुळे जाऊ नयेत, याची काळजी बाबासाहेबांच्या अनुयायांनी घेणे भाग आहे, असे प्रा. मोरे यांना अतिशय तीव्रतेने वाटले... केवळ एक सावरकरवादी विचारवंताचे हे लेखन आहे या एकाच कारणासाठी या गंभीर मुद्दयाकडे दुर्लक्ष होऊ नये.. "डॉ. आंबेडकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथसंपदेचा एकत्रित स्वरूपात विश्लेषक असा परिचय या पुस्तकात आहे. पण हा ग्रंथ म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण विचारांची चिकित्सा नव्हे किंवा ग्रंथांची समीक्षा नव्हे !... महापुरुषाच्या लेखन- उक्तीत अनेक प्रसंगी अंतर्विरोधही दिसून येतो, हा अंतर्विरोध दाखवून देत आंबेडकरी विचारांची संगती वाचकांसमोर ठेवणे हा या ग्रंथाचा हेतू आहे... डॉ. आंबेडकरांच्या लेखनात व्यक्त झालेले बदल वा अंतर्विरोध हे त्यांच्या कार्यक्रमाधिष्ठित प्रवासाशी कसे सुसंगत आहेत, त्याचाही अन्वय या ग्रंथात आहे... अतिशय निकोप मनाने या ग्रंथाचे स्वागत करायला हवे... योग्य दिशेनेच दखल घेतली जावी.' - दत्ता भगत
इतिहासDr. Ambedkaranchya Samajik Dhornatil Parivartane | डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील परिवर्तने
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart
">
Skip to content
