कवितासंग्रह
-
Sale! Add to cartहा एक अगदी वेगळ्या वाटेनं जाणारा चित्रसंग्रह. तो पाहायचा आणि वाचायचाही. वाचायच्या आहेत त्या कविता. चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात. प्रत्येक चित्र सरळ पाहायचं. नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं. असा अफलातून संग्रह प्रथमच माझ्या पाहण्यात आला... ...पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास, गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील. पाहणा-याच्या दृष्टीवर ते सोपवावं. प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं. एक कोडं घालतं. मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं. असा हा दृश्यकलेचा खेळ. वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा. चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन:पूर्वक अभिनंदन! - शि. द. फडणीस, पुणे
कवितासंग्रहDwaichitrya | द्वैचित्र्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartकिती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या। डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या। ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले। अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या।
कवितासंग्रहHya Panpoeivar Milate Phakta Tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमाणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत. आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे, एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत. माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना 'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे. माणुसकीचा अमर्याद आशावाद उराशी बाळगणाऱ्या एकनाथ आव्हाड यांना अशाच प्रेरक लेखनासाठी माझे शुभाशीर्वाद. मधु मंगेश कर्णिक
All BooksJagana Hoil Hiravagar | जगणं होईल हिरवंगार
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartश्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची कविता विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. १८८९ ते १९३४ असे अवघ्या चव्वेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. केशवसुतांचा मोठा प्रभाव असणारा हा काळ! मात्र याच काळातली असली तरी वीर आणि शृंगार अशा दोन्ही रसांचा प्रमत्त आविष्कार करणारी त्यांची कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे. विविध ज्ञान विस्तार; किंवा वागीश्वरी सारख्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या, तरी वाङ्मयविश्वातील झगमगाटापासून ते स्वाभाविकपणे दूर होते. त्यांच्या कविता संग्रहरूपाने प्रथम प्रकाशित झाल्या १९३७मध्ये. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी. एकीकडे संस्कृत काव्याचे संकेत सांभाळणारी आणि दुसरीकडे पोवाडे आणि लावण्यांची कास धरणारी, एकीकडे हरहर महादेव चा घोष घुमवत वीरश्रीला आवाहन करणारी आणि दुसरीकडे पहिल्या चुंबनाचा आनंदानुभव सांगत प्रेमाच्या वृंदावनात रास रचणारी बोबडे यांची कविता आहे. समरांगणात आणि रतिरंगणात ती सारख्याच चैतन्याने चमकते. ओळख झाली ज्यास स्वत:ची वेद तयास कळो न कळो रे असे अंतर्लीन माणसाला अभयाचे मौलिक आश्वासन देणारी ही कविता खरे तर मराठी वाङ्मयाभिरुचीच्या प्रवासातली एक लक्षणीय कविता आहे. अरुणा ढेरे
All BooksKalo Na Kalo Re | कळो ना कळो रे
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cart'हिमांशु कुलकर्णी की रचनाएँ उनके जज्बात और एहसासात का आइना है... उन्हें जब जहाँ जैसा दिखाई दिया है, उसे अपने शब्दों में बयान किया है। उनके इज़हार का फार्म गज़ल है। इन गज़लों में, परम्परागत मीनाकारी नहीं है, शब्दों की प्रचलित लयकारी से भी कहीं कहीं आज़ादी बरती गयी है, मगर जो विशेषता इन्हें रचनात्मक सौंदर्य से सजाती है, वह कवि की ईमानदारी है। उन्होंने जैसा जिया है, वैसा लिखा है। अपने अनुभवोंपर विश्वास और उनको बयान करने की निरन्तर प्यास ने साधारण लफ्ज़ोंको जगमगाया है। और पढने वालों में यह एहसास जगाया है... कि सोना खरा हो तो उसे किसी टकसाल की मुहर की ज़रूरत नहीं होती। मराठी और उर्दू के इस इंटरएक्शन ने न सिर्फ़ उनके अंदाज़ में ताज़ाकारी पैदा की है - एहसासातो जज्बात की ऐसी सूरतें भी कामयाबी से उभारी हैं... जो उनकी गज़लों की अलग से पहचान कराती हैं। निदा फ़ाज़ली
कवितासंग्रहKatra Katra Gam | कतरा कतरा गम
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartहिमांशुंच्या कवितेत, पळसपानांचे द्रोण, प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं जशी येतात तसंच सलाइन आणि स्कॉचच्या बाटल्या येतात, इन्फ्रारेड डोळे येतात आणि सेपीया रंग येतात. अर्मानीसारख्या उंची, अभिनव सुगंधाचा उल्लेख येतो आणि केसांचा नायगारा येतो. ह्या सगळयांना संदर्भ असतो कवीच्या एका वेगळ्याच उत्कट, जिवंत अनुभवाचा. मला ह्या कविता फार आवडल्या म्हणून कौतुकाचे, आशीर्वादाचे हे चार शब्द लिहिले, इतकंच. इंदिरा संत
कवितासंग्रहKavita Udhwasta Ratrinchya | कविता उद्ध्वस्त रात्रींच्या
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartया पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे. एक ठणक निघते काळजातून अन् जाऊन बसते कागदावर तुम्ही कविता' म्हणता तिला...'' ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित करणार् या घटना अन् प्रसंगांची! ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर् हासाची ! भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून निर्माण झालेल्या शोषणाच्या नवनव्या तर् हांनी बरबटलेला जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ झालेला समकाळ म्हणजे - खांदे सुजलेले दिवस
All BooksKhande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreउम्मीद भी है घबराहट भी है कि अब लोग क्या कहेंगे, और इससे ब़डा डर यह है कहीं ऐसा ना हो कि लोग कुछ भी न कहें - गुलजार या भावनेनंच हा कवितासंग्रह वाचकांसाठी - '
कवितासंग्रहKora Kagad….Nili Shai | कोरा कागद… निळी शाई…
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'जीवन जगताना माणूस सृष्टीमधला निसर्ग, त्यातील वनस्पती-प्राणी यांच्यासह पृथ्वीवरची इतर माणसं यांच्याशी घट्टपणे विणला गेलेला असतो. त्यामुळेच बदलत्या समाजजीवनात चांगल्या गोष्टी वाचवण्यासाठी अन् वाईट गोष्टी थोपवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. त्या संघर्षात म्यानातली शस्त्रं बाहेर काढावी लागतील, पण ही शस्त्रं वेगळी असतील. कवीच्या म्यानात आहेत अशीच आगळीवेगळी शस्त्रं. प्रदूषण रोखायचं, तर पर्यावरण-रक्षणाची कुदळ अन् वृक्षसंवर्धनाचं फावडं. कुटुंबव्यवस्था सांधायची; तर नाती घट्ट, बळकट करणारं प्रेमाचं, आपुलकीचं काँक्रीट. इंटरनेटचे दुष्परिणाम रोखायचे, तर विवेकाचा जागर. राजकीय विसंगतीचा प्रश्न सोडवायचा, तर सारासार विचाराचं उत्तर. चंगळवाद नाकारायचा, तर जीवनशैली बदलण्याचा निर्धार. प्रेम, मनातली स्पंदनं, व्यवहाराची जगरहाटी, जोडीला भविष्यात येऊ घातलेले बदल आणि त्यामुळे व्यामिश्र सामाजिकतेची अन् वैयक्तिक भावजीवनाची, अस्तित्वाची होऊ पाहणारी लढाई - या गाभ्यातून उमटलेल्या कविता म्हणजे मनातले काही, काही म्यानातले...
कवितासंग्रहManatale Kahi, Kahi Myanatle | मनातले काही, काही म्यानातले
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartलेकराचा जन्म होतो आणि नाळ कापली जाते. लेकराचं अस्तित्व आईपासून स्वतंत्र होतं; पण शेवटपर्यंत नाभीची खूण देहाला सोडत नाही आणि मनातला आईचा दरवळ थांबत नाही. आई असताना-नसतानाचे भावविभोर काळाचे तुकडे गुंफून हा मातृसूक्ताचा लोभस कोलाज तयार झाला आहे. आई गंऽऽ या सहजोद्गाराचा मनस्वी विस्तार या कवितांतून जाणवत राहतो. पानोपानी, ओळीओळीत नि शब्दाशब्दात आई भरून आहे. बापू दासरींच्या या कवितेत भारावून टाकणारी विलक्षण मातृलय आहे. ही नाभीतून उगवलेली कविता वाचकांच्या मनात आईची ऊब उजागर करते. दासू वैद्य
All BooksMatrusookta | मातृसूक्त
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content