समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartअर्थशास्त्र म्हणजे संभाव्यतेचे शास्त्र, पण दिसते मात्र अशक्य कोटीतल्या कालाकृतीसारखे'. अर्थशास्त्राची अशा प्रकारची व्याख्या भारताच्या प्रत्येक अर्थमंत्र्याला रुचेल आणि संवादी वाटेल. कारण त्याला दरवर्षीच आशेची जादुई किल्ली वापरण्याचे कौशल्य दाखवावे लागते. आणि सुप्रसिध्द भारतीय दोरीची जादू करावी लागते. म्हणजेच अंदाजपत्रक सादर करावे लागते. अंदाजपत्रकात मोठ्या कौशल्याने मिळकत आणि खर्च यांचा टोला काळजीपूर्वक साधलेला असतो. कराचे दर आणि करसवलती, विकास आणि सामाजिक न्याय सुधारणा आणि स्थितीवाद या सा-यांचाच तोल अर्थमंत्र्याला साधायचा असतो. या मर्यादेतसुध्दा अर्थमंत्री खूप काही उद्दिष्ट्ये साधू शकतात. पी. चिदंबरम हे एक नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि टीकाकार आहेत. त्यांच्या या लेखांमधून याचे सम्यक दर्शन आपल्याला घडते. या लेखांमधून त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडी सरकारच्या २००२ ते २००४ या काळातील कारकिर्दीचे मूल्यमापन केले आहे. मूळ लेख इंग्रजीमधून 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'फायनान्शियल एक्स्प्रेस' मध्ये प्रसिद्ध झालेले होते. १९९६ ते १९९८ या काळात पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते आणि २००४ पासून ते पुन्हा अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांनी केलेल्या स्तंभलेखनातून विविध प्रकारच्या व्यापक प्रश्नांवर निरुपण केले आहे. सदर लेखांमध्ये शेती (केवळ अन्नसुरक्षा म्हणून नव्हे तर रोजगाराचा प्रमुख स्त्रोत म्हणून), आर्थिक सुधारणा, अंदाजपत्रके, परकीय चलनाची गंगाजळी (काही वर्षांपूर्वी तिचा तुटवडा होता आणि आता प्रचंड साठा आहे आणि त्यातून नवे प्रश्न उभे राहत आहेत.), आर्थिक वाढ आणि करधोरण अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्यात राजकीय घडामोडींची निरीक्षणे आणि परिशीलन आहे. सामाजिक प्रश्नांवरील परखड विचार आहेत. चिदंबरम या काळातील घटनांवर निव्वळ प्रतिक्रिया देऊन थांबत नाहीत, तर त्यांच्या लेखनातून वाचकाला भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांची अतिशय स्वच्छ, नितळ अशी समज येते. त्याचप्रमाणे राजकीय प्रश्न आणि ते सोडविण्याचे मार्ग यांचाही उमज पडतो. त्यांनी हाताळलेले सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून गेल्या काही वर्षांत जी आर्थिक वाढ झाली ती टिकविण्याच्या संदर्भातील कळीचे मुद्दे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे हे लेख म्हणजे एका अर्थमंत्र्याने कुंपणाच्या पलीकडे बसलेल्या दुस-या अर्थमंत्र्याला दिलेली टिपणे आहेत, असेही त्यातून प्रतीत होते.
समाजकारण / राजकारणAlipta Drushtikonatun | अलिप्त दृष्टिकोनातून
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो - माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट! मात्र आज धर्म या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन... हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ. धर्म आणि हिंसा'
समाजकारण / राजकारणDharma Aani Hinsa | धर्म आणि हिंसा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartप्रसिध्द इतिहासकार ॲर्नाल्ड टॉयनबी म्हणतो, की हिंदू (भारतीय) संस्कृती ही आजच्या जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. भारतीय उपखंडाएवढया मोठया प्रदेशात, अडीच हजार वर्षांपूर्वी ती पसरली होती. अशी गोष्टही जगाच्या इतिहासात प्रथमच घडली. नद्यांची सुपीक खोरी, मोठी लोकसंख्या आणि साधनसामुग्री असलेला हा भूप्रदेश आणि शौर्याचा, ज्ञानाचा वारसा असलेली संस्कृती हे, हेवा वाटावा असे देणे आपल्याला लाभले. इतिहासाकडे मागे वळून पाहताना जे दिसते ते असे : चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी २४०० वर्षांपूर्वी ग्रीक आक्रमण परतवून या उपखंडात सीमा सुरक्षित असलेले एक सुनियंत्रित साम्राज्य निर्माण केले. टॉयनबी याला भारतातील पहिली युनिव्हर्सल स्टेट असे म्हणतो. त्यानंतर जी राजकीय, धार्मिक आक्रमणे झाली त्याला विरोध झाला तरी असे पूर्ण यश पुन: हाती लागले नाही. भारतात मोगल साम्राज्य स्थापणारा बाबर अवघ्या पंधरा हजार सैन्यानिशी आला होता. रजपुतान्याकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती निश्चित होती. इंग्रज मूठभर होते. त्यांनी मराठयांना पराभूत करून दीडशे वर्षे राज्य केले. रजपूत, जाट, विजयनगर, मराठे, शीख एकएकटे लढले आणि पराभूत झाले. अशा शक्ती योग्य वेळी एकत्र आल्या असत्या, तर भारताचा इतिहास वेगळा घडला असता. हिंदू समाजातील ज्या त्रुटींमुळे पूर्वेतिहास असा घडला, तेच दोष आजही आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत का ? हिंदू समाजाला परिवर्तनाची गरज आहे का? आणि त्या परिवर्तनाची दिशा कोणती, असे हे अस्वस्थ करणारे प्रश्न. या अस्वस्थतेचा प्रत्यय वाचकांपर्यंत पोहचावा ही 'एक अस्वस्थ हिंदू मन' या लेखनामागची भूमिका.
समाजकारण / राजकारणEk Aswastha Hindu Man | एक अस्वस्थ हिंदु मन
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...'
समाजकारण / राजकारणJagayachihi Sakti Ahe…. | जगायचीही सक्ती आहे…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर् याच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार् या विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार् यांना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही आणि हुकुमशाही
All BooksLokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक...
समाजकारण / राजकारणNeelchi Shala : Sameerhill | नीलची शाळा : समरहिल
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart
">
Skip to content