WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

माझी आवडती कादंबरी ‘#लस्टफॉरमुंबई’

99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष #विश्वासपाटील यांना बऱ्याचदा मुलाखतीत प्रश्न विचारला जातो.. तुम्ही इतक्या कादंबऱ्या लिहिल्या  पण तुमची आवडती कादंबरी कोणती..

उत्तर एकच असतं.. ‘लस्ट फॉर मुंबई’

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे… म्हणजे ‘लस्ट फॉर #मुंबई’ कादंबरी..

मायानागरीत संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैया दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळ्या उखडल्या.

चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला !

तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…

म्हणजे ‘लस्ट फॉर #मुंबई’ 

#गिरणीकामगार 

#VishwasPatil #MarathiLiterature #MarathiCulture

#JayMarathi #Babasaheb Ambedkar

 #Literary Journey

#SahityaSammelan #MarathiAbhiman

#Cultural Heritage #ThoughtLeaders

#HistoryAndLiterature #MarathiManus

Latest Posts

कसा  सापडला  कार्व्हर?

पुस्तकामागच्या गोष्टी  #एकहोताकार्व्हर   प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट...

विवेकयात्री

डॉ. शरद जावडेकर ‘सदविवेकवीण सर्व भांबावले,  रक्तपाती झाले ज्योती म्हणे!’...

काळ्यानिळ्या रेषा

दाहक सामाजिक दस्तावेज.. डॉ. प्रिया  निघोजकर  मराठी साहित्यातल्या आत्मकथनांच्या परंपरेत साठच्या...

Scroll to Top
">